Saturday, August 28, 2010

चतुर कोल्हा उवाच...

सायप्रसमध्ये (सायप्रस हा एक देश आहे आणि बऱ्याच लोकांना ते माहित नाही. असो.) राहून मला आता कंटाळा यायला लागला होता. २४ तास इंटरनेट होते आणि मेल्स, चाटिंग करून पण खूप वैताग आला होता. नवीन करण्यासारखे काही नव्हते आणि मग ब्लॉग वाचू लागलो...
आणि बरेच प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध ब्लॉग वाचून झाल्यावर मला पण ब्लॉग लिहायची स्फूर्ती आली...

आता आली का पंचाईत... कारण ब्लॉग लिहिणार तरी कशावर. मग परत एकदा बऱ्याच ब्लॉगची सुरुवात आणि पहिले पोस्ट वाचले. साधारण तेचतेच विषय होते आणि म्हणून ब्लोग्स लिहिणार्यावरच पहिला पोस्ट लिहावा असे ठरवले.

आता मला जे वाटले आणि जाणवले ते मी लिहित आहे ..
मला ठळकपणे जाणवलेल्या काही गोष्टी -
१. ब्लोग्स लिहिणारे बरेचसे लोक हे भारतात राहत नाहीत. म्हणजे निदान त्यांची सुरुवात तरी भारताबाहेर असताना झालेली असते. याला कारण म्हणजे (जे मी स्वतः अनुभवलेले आहे) ते म्हणजे बाहेर जाऊन येणारे एकटेपण. मी सायप्रसला आहे आणि इथे लोक वेळेवर घरी जातात ऑफिसमधून. भारतात राहून रात्री उशिरापर्यंत काम करणारा मी, इथे आल्यावर एकदम मोकळा झालो. अचानक मला बराच मोकळा वेळ मिळायला लागला. रात्री ८ वाजे परियंत असणारा उजेड, इथे नसलेले मित्र आणि वेळ पाळणारे ऑफिसवाले यांच्यामुळे मला ब्लॉग लिहिण्याची स्पुर्ती मिळाली.

२. आता उरलेले ब्लॉग लिहिणार्यांमध्ये बरीचशी लोकं ट्रेकर आहेत. सह्याद्रीने वेड लावलेली. मी पण एक ट्रेकर आहे पण जास्त ट्रेक करत नाही. ह्यांनी ट्रेकवरचे लिहिलेले पोस्ट्स खूप माहिती देऊन जातात.

३. आता उरलेले लोक हे mixed आहेत. त्यांच्याबद्दल काही जास्त माहिती नाही मला.

४. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे बरीचशी मंडळी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातली आहेत. कामातून आलेले frustration, pressure etc ते ब्लॉग लिहून कमी करतात असे मला वाटते. आणि हो बाकी क्षेत्रातील लोकांनासुद्धा ब्लोग्स विषयी जागरूक केले पाहिजे.

आता इथेच थांबतो. मला लिहायचा कंटाळा आला आहे. इतके मोठे लिखाण मी कधीच केले नाही (शाळेतील निबंध वगळता).

आपण जर हा पहिला पोस्ट वाचलाच आहे तर आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

टीप : पहिलाच पोस्ट आहे ह्याचा विचार करूनच प्रतिक्रिया द्या.